शिक्षण संस्थाना गणवत्तापणाशक्षणाकडे लक्ष द्याव- उदय सामत

मुंबई : शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारणेकडे | लक्ष द्यावे. उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करुन | विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून देता येईल का याकडे अधिक लक्ष द्यावे, असे उच्च | व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. आज विधानभवनात नवीन महाविद्यालय | स्थापन करण्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन बृहत आराखडा तयार करण्याबाबत बैठक | आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते. श्री. सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक | धोरणासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक | धोरण विचारात घेऊन बृहत आराखडा तयार केला आहे, तो तपासून काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण कराव्यात. अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे याचा विचार करुन याच | महाविद्यालयामध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु | करण्यासंदर्भात अभ्यास करावा. स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय साप्ताहिक ग्रामसुधारक संचालक डॉ. अभय वाघ तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. व व्यापाऱ्यांनी काढुन दुर्घटनेतुन |